Homeशहरउल्हासनगरमध्ये विकासकामांना मिळाली गती : पॅनल ३ आणि ११ मधील विविध...

उल्हासनगरमध्ये विकासकामांना मिळाली गती : पॅनल ३ आणि ११ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

  • दोन पॅनलमधील ५ कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी ): १४१ उल्हासनगर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने प्रभागातील विविध विकास कामे करण्यासाठी मूलभूत सुविधा अंतर्गत निधी मंजूर केला असून या विकास कामांचा शुक्रवारी भूमिपूजन सोहळा पार पडला. कुमार आयलानी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरातील विविध विकास कामांना गती मिळत आहे. याच अनुषंगाने, आमदार कुमार आयलानी यांनी शुक्रवारी पॅनल क्रमांक ३ आणि पॅनल क्रमांक ११ मधील ५ कोटींहून अधिक रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

त्यावेळी पदपथ, गटार, काँक्रीटचे मार्ग, शेड, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक शौचालये, सुशोभीकरण आणि सुरक्षा भिंती यांसारख्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार कुमार आयलानी यांच्या अथक प्रयत्नांमुळे, सुमारे ५ कोटी रुपयांच्या मूलभूत सुविधा निधीतून ही सर्व कामे केली जात असून, परिसरातील नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होत आहेत.

या कार्यक्रमादरम्यान महायुतीची एकताही दिसून आली. भाजप आणि शिवसेनेचे अनेक अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये आणखी विकास कामे सुरू केले जातील आणि त्याचे देखील भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि उल्हासनगर एक समृद्ध व विकसित शहर बनावे, यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवू, असे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना सत्तेत असून सर्व नगरसेवक विकासाच्या भावनेने काम करत आहेत  ज्यामुळे शहराच्या विकासाला एक नवी ओळख मिळेल

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया, उपमहापौर अमर लुंड, रवी जग्यासी, राजू जग्यासी, लाल पंजाबी, मनोहर खेमचंदानी, प्रीती विनोद माखिजा, कविता लाल पंजाबी, संजय घुगे, बिंदर भाई, प्रवीण क्रिसनानी, हरेश भाटिया, भुल्लर महाराज, साबिर शेख, प्रमोद पांडे, शोभाताई जाधव, मंडल अध्यक्ष अरविंद मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

5 सौंदर्य सवयी ज्या बहुतेक श्रीमंत स्त्रिया त्या चमकदार त्वचेसाठी फॉलो करतात

पुष्कळ लोक मुरुम, रंगद्रव्य किंवा बारीक रेषा स्पष्ट झाल्यानंतरच त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करतात. श्रीमंत स्त्रिया सहसा स्किनकेअरकडे वेगळ्या पद्धतीने संपर्क साधतात - त्या...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

कृणाल पांड्याची मुलाखत: ‘देशासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीही नाही’ – RCB स्टारने भारताचे स्वप्न पूर्ण...

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कृणाल पांड्या (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) बेंगळुरू: सुमारे 15 वर्षांपूर्वी, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पालेज या छोट्याशा गावात मॅटिंग विकेटवर, एका दुबळ्या...

सोहराब ‘बनावट चकमक’ प्रकरणात 21 पोलिस आणि नागरिकांची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाने कायम...

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील २१ पोलीस अधिकारी आणि २००५ च्या सोहराबुद्दीन शेख 'बनावट चकमक' प्रकरणातून एका...

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, महाराष्ट्रातील एका दिवसातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

5 सौंदर्य सवयी ज्या बहुतेक श्रीमंत स्त्रिया त्या चमकदार त्वचेसाठी फॉलो करतात

पुष्कळ लोक मुरुम, रंगद्रव्य किंवा बारीक रेषा स्पष्ट झाल्यानंतरच त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करतात. श्रीमंत स्त्रिया सहसा स्किनकेअरकडे वेगळ्या पद्धतीने संपर्क साधतात - त्या...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 5 दिवसांनी महाराष्ट्रातील तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला

पुणे - एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय...

कृणाल पांड्याची मुलाखत: ‘देशासाठी खेळण्यापेक्षा मोठे काहीही नाही’ – RCB स्टारने भारताचे स्वप्न पूर्ण...

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कृणाल पांड्या (पीटीआय फोटो/शैलेंद्र भोजक) बेंगळुरू: सुमारे 15 वर्षांपूर्वी, गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील पालेज या छोट्याशा गावात मॅटिंग विकेटवर, एका दुबळ्या...

सोहराब ‘बनावट चकमक’ प्रकरणात 21 पोलिस आणि नागरिकांची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयाने कायम...

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील २१ पोलीस अधिकारी आणि २००५ च्या सोहराबुद्दीन शेख 'बनावट चकमक' प्रकरणातून एका...

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, महाराष्ट्रातील एका दिवसातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...
error: Content is protected !!