उल्हासनगर दि.२ : एसएसटी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणि कामगार चळवळीबद्दल जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने केले होते. प्रारंभी महाविद्यालयाचे चेअरमन व संस्थापक प्राचार्य डॉ.पूरस्वानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे, डॉ.दीपक गवादे आणि डॉ. संतोष करमानी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.देविदास जळकोटे तसेच प्रा.दीपक मुलपानी, श्री. राजेश प्रेमानी उपस्थित होते. राष्ट्रगीतासोबतच महाराष्ट्र राज्यगीताचेही गायन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास आणि कामगार चळवळीवरील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत रॅलीचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उपप्राचार्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुवर्णा निकम, प्रा.नेहा तेलानी तसेच ग्रीन क्लब च्या समन्वयिका प्रा.नम्रता सिंग, प्रा. स्नेहा गुप्ता , प्रा.शिल्पा जळकोटे आणि स्वयंसेवकांनी केले.





























