उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक ३५२ वा आहे (६ जून १६७४ रोजी पहिला राज्याभिषेक झाला होता). हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन किंवा सोहळा म्हणून साजरा केला जातो. उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प येथ श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विभागात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरजी कन्हेरे( संघटक मराठा विकास सामाजिक संस्था), अनिलजी पावसे सर (अध्यक्ष हनुमान व्यवस्थापक मंडळ)., प्रशांत बुटरे (आर एस एस चे अंबरनाथ जिल्हा प्रचार प्रमुख). उपस्थित होते.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून महाराजांची आरती घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महाराजांचे कर्तृत्व आणि इतिहास उपस्थितासमोर मांडला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक. रविंद्र मिंडे., शाम छाबरिया, शेखर कोल्हे, सुनील डुंबरे, यतिन डुंबरे, संदीप डुंबरे, जयदेव छाबरिया, विनोद मिंडे, प्रमोद मिंडे, संजय बलकवडे, शांताराम फटांगारे,प्रकाश दोडेजा व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अण्णासाहेब खतोडे सर यांनी केले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेख सोहळा दरवर्षी किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. उल्हासनगर मध्ये श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विभागात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.





























