उल्हासनगर दि.१९ : शिवसेना (उबठा)चे उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगर मधील माता रमाबाई आंबेडकर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

आदिनाथ पालवे यानी सामाजिक बांधीलकी जपत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय किटचे वाटप, पालकत्व गमावल्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना सुरू करून दिलं, गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देणे. कधी निराधार झालेल्या कुटुंबांना अर्थसहाय देणे तर कधी गरजू कुटुंबांना महिन्याचे रेशन उपलब्ध करून देणे. त्यांनी वेळोवेळी सामूहिक प्रयत्नाने समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला.

सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिकत आहे. मानवलोक व समाजसेवकच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले. वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. समाजव्यवस्थेत फक्त आपली मुलं, पत्नी एवढेच विश्व न घेता सर्व समाजातील लोकांना घेवून जगणाऱ्या कुटुंबासमोर वाढदिवस हा एक आदर्श असणार आहे एवढं मात्र निश्चित, विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर ३ मधिल माता रमाबाई आंबेडकर शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे,शहरप्रमुख कुलविंदर सिंग बिंदर बेन्स , सेंट्रल हॉस्पिटलचे अधीक्षक मनोहर बनसोडे, मनपा माजी उपायुक्त वैष्णवानंद गर्जे, समाजसेवक शिवाजी रगडे महानगरप्रमुख रागाचरण करोतीया, माजी नगरसेवक गजानन शेळके , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, युवक प्रमुख दशरथ चौधरी, शाखाप्रमुख तानाजी माळी, मुख्याध्यापक जी टी पवार सर मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनी, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.






























