उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेने शहरात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत जवळपास चार कंपन्यांनी आपल्या निविदा भरल्या होत्या. पण निविदा मधील अटी शर्यतीत सर्वच कंपन्या बाद झाल्या असताना पालिकेने बाद झालेल्या एका कंपनीला शहरातील नालेसफाईचा ठेका दिल्याने उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराबाबत शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. या निविदा प्रक्रियेत जवळपास चार कंपनींनी निविदा भरल्या होत्या. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निविदा प्रक्रिया पार पडली. निविदा प्रक्रियेत ज्या अटी शर्यती होत्या त्यात चारही कंपन्या पूर्ण करू शकले नाही आणि त्यामुळे चारी कंपन्या या निविदा प्रक्रियेतून बाद झाल्या. मात्र याच निविदा प्रक्रियेतून बाद झालेल्या शुभम कन्स्ट्रक्शन या कंपनीला शहरातील नालेसफाईचा तब्बल एक कोटी ६९ लाखांचा ठेका देण्यात आला. पालिकेच्या या अजब कारभाराबाबत आक्षेप उपस्थित केले जात आहे. जर ही कंपनी बाद ठरली आहे तर तिच्यावर उल्हासनगर महापालिका इतकी मेहरबान का झाली? या कंपनीला हे काम दिल जातंय दुसऱ्या कंपन्यांना हे काम का दिल जात नाही. जर निविदा प्रक्रियेतून बाद झालेल्या कंपनीला काम द्यायचं होतं तर.निविदा प्रक्रिया राबवली गेली ती फक्त देखावा करण्यासाठी का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील काही अधिकारी व सत्ताधारी यांच्या मर्जीतील ही कंपनी व ठेकेदार असल्याने त्यामुळेच हे काम दिले गेले असल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी ही निविदा प्रक्रिया पार पडली पण अजूनही नालेसफाईचा काम सुरू झालं नाही शिवाय पाऊस आल्यानंतर जे नाले आहेत ज्याच्यात कचरा भरलेला आहे ती घाण वाहून जाईल आणि या ठेकेदाराला तसेच पैसे मिळतील का असा देखील सवाल उल्हासनगरातील नारारिक उपस्थित करत आहेत.
याबाबत महानगरपालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले उल्हासनगरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या उद्देशाने जी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्या निविदा प्रक्रियेत सर्वच कंपन्या बाद ठरल्या. पावसाळा तोंडावर आल्याने आणि महानगरपालिकेकडे वेळ नसल्यामुळे शहरातील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे गरजेचे होतं. त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराला नालेसफाईचा ठेका देण्यात आल्या आहे असे मनीष हिवरे यांनी सांगितले.




























