उल्हासनगर दि ७ : आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही उल्हासनगर मधील एस एस टी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.यंदा महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९४ .४४ %, वाणिज्य शाखेचा ८८ .९४ %, तर कला शाखेचा निकाल ७६ .४७ % लागला.
वाणिज्य शाखेत अर्जुन गुप्ता याने ८७.३३ % गुण घेत प्रथम क्रमांक, सृष्टी त्रिपाठी ८४.६७ % द्वितीय क्रमांक तर आलीक्या इलोनी हिने ८३ % संपादन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विज्ञान शाखेमध्ये रोहन पवार ७९.८३ % प्रथम क्रमांक, अभिषेक मुदलियार ७६.३३ % द्वितीय क्रमांक आणि शुभम साहू ७१.५० % तृतीय क्रमांक तर कला शाखेत धनश्री तरे ७१.८३ % घेत प्रथम, वर्षा घोरपडे ६२.८३ % द्वितीय आणि शुभांगी रौराळे हिने ६१.८३ % तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे व्यवस्थापन, तसेच संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.देविदास जळकोटे, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. बारावी नंतरच्या करिअरच्या वाटा या संदर्भात महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.





























